मोदींच्या विजयाची कारणे- भाग २
२. राहुल गांधी आणि काँग्रेस काँग्रेसच्या पराभवाला , उतरणीला आणि भाजपाच्या सर्वदूर पसरण्याला कोणी जबाबदार असेल तर ते म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींची सगळ्यात मोठी चूक जर काही असेल तर ती म्हणजे त्यांनी स्वतःची नरेंद्र मोदींबरोबर केलेली तुलना!! राहुल गांधी हे कर्तुत्वानी अथवा व्यक्तिमत्वानी नरेंद्र मोदींच्या जवळपास देखील पोहोचत नाहीत. राहुल गांधी हे एका हिमालयाएवढ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाशी लढत होते. मोदी ३ वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते नंतर भाजपाच्या २८२ जागा त्यांनी निवडून आणल्या होत्या आणि पंतप्रधान झाले. त्यासमोर राहुल गांधींच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत उल्लेखनीय असं काहीच नाही. राज्यांच्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जर काँग्रेसनी जिंकल्या असतील तर त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा त्या त्या राज्यातल्या स्थानिक नेतृत्वाचा आहे. परंतु काँग्रेसच्या परंपरेनुसार जेव्हा विजय होतो तेव्हा तो गांधींमुळे असतो परंतु जेव्हा पराभव होतो तेव्हा तो गांधी सोडून सगळ्यांमुळे असतो. राहुल गांधींवर भाजपाने आणि मोदींनी नेहमीच वंशवादाचा ठपका ठेवला आहे. परंतु ह्या आरोपाचे उत्तर केवळ आण...